स्वावलंबी आदिवासी महिला

11 Jul 2025 12:34:26

sanskrutik vartapatra mahila_26 (1).jpg
 
राजस्थानातील आदिवासी बहुल बांसवाडा जिल्ह्यातील डोंगर आणि जंगलांमध्ये वसलेल्या वडालपाडा गावात स्थलांतर थांबले आहे. येथील सुमारे ५० महिला झाडांची पाने, फुले आणि मातीमध्ये बकरीचे दूध मिसळून ९ प्रकारचे हर्बल साबण तयार करतात. या साबणाची मागणी इतकी जास्त आहे की ७० रुपयांचा हा साबण वर्षभरात २० हजारांहून अधिक वेळा विकला गेला आहे. पूर्वी त्या सुटा साबण विकत असत, परंतु आता त्यांनी ते स्वतः पॅक करून पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. गावातील अनेक कुटुंबे यात सामील झाली आहेत. कोणत्याही रसायनांशिवाय आणि मशीनशिवाय केवळ बकरीचे दूध व घरगुती साहित्य वापरून त्या साबण तयार करतात. बकरीच्या दुधामुळे त्वचा सौम्य राहते, म्हणून याचा वापर केला जातो, असं त्या सांगतात.
 
 
या गावातील रुमकांता डामोर मोर ही महिला दीड वर्षांपूर्वी जयपूरमधील राजीविका मेळ्यात गेली होती. तिथे तिने अनेक हर्बल उत्पादने पाहिली. तिथून तिला हर्बल साबण तयार करण्याची कल्पना सुचली. २-४ महिलांनी सुरू केलेल्या या कामात आता एका वर्षात ५० महिला सामील झाल्या आहेत. गढी ब्लॉकमधील वडालपाडा गावातील महिला कडुनिंब, कोरफड, संत्री, लिंबू, केशर, चंदन, मुलतानी माती आणि गुलाब साबण तयार करतात.

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या हर्बल साबणांची मागणी वाढत आहे. इतर गावांतील महिलाही यात सामील होत आहेत. आता हे साबण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील आणण्याचा त्यांचा विचार आहे.

दैनिक भास्कर ७/७/२५
Powered By Sangraha 9.0