अरवली पर्वतरांगा पुन्हा हिरवाईने नटणार

09 Jun 2025 11:07:54

sanskrutik vartapatra paryavaran_6 (1) 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली ते गुजरातपर्यंत पसरलेल्या ७०० किमी लांबीच्या अरवली पर्वतरांगांमध्ये नव्याने वनीकरण करण्यासाठी विशेष 'अरवली ग्रीन वॉल प्रकल्प सुरू करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत अरवलीच्या २९ जिल्ह्यांमध्ये सुमारे १,००० रोपवाटिका उभारल्या जाणार आहेत. ७०० किमी लांबीच्या अरवली पर्वतरांगांमध्ये नव्याने वनीकरण करण्यासाठी विशेष 'अरवली ग्रीन वॉल प्रकल्प' करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचा उद्देश काय ?
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जैवविविए जैवविविधतेचा संवर्धन, पुनर्वन आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढणे, पाण्याची उपलब्धता सुधारणे करणे शक्य होणार आहे.
अरवली संकटात का आहे?
अत्याधिक खाणकाम, जंगलतोड, जनावरांचे चरणे, मानवी अतिक्रमणामुळे अरवली पर्वतरांगा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहेत. येथील भूगर्भजल स्रोत नष्ट होत आहेत. जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत ५/६/२५
Powered By Sangraha 9.0