
प्रमुख भारतीय विमानतळांजवळ पक्ष्यांच्या धडकेच्या वाढत्या घटना आणि कर्णावतीत नुकत्याच झालेल्या भीषण विमान अपघातात पक्षी धडकेचा संशय पाहता हिंदू जनजागृती समितीच्या 'सुराज्य अभियाना' ने सरकारला निवेदन दिले आहे.
विमानतळाच्या १० किलोमीटरच्या क्षेत्रात पशुवधगृहाला बंदी आहे. असे असूनही या नियमाचे उल्लंघन करून २०२४ आणि २०२५ मध्ये शेकडो बृहन्मुंबई महानगरपालिकेने पशुवधगृहांना परवाने दिले आहेत. या विरोधात 'भारतीय प्राणी कल्याण मंडळ' यांनी तक्रार केली आहे. ही अनधिकृत मांसाची दुकाने पक्ष्यांसाठी आकर्षण ठरतात, ज्यामुळे हवेत विमानांना पक्षी धडकण्याचा धोका वाढतो.याचा विचार व्हायला हवा आणि अशी दुकाने चालवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी असे या मंडळाचे म्हणणे आहे. सनातन प्रभात १८.६.२५