पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकच्या संसदेत भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सीएन्एन् (केबल न्यूज नेटवर्क) या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीतही हाच दावा केल्यावर मुलाखत घेणार्या पत्रकाराने याचा पुरावा विचारला. यावर ख्वाजा आसिफ यांनी ‘सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे. भारतीय सामाजिक माध्यमांतही प्रसारित होत असून विमानांचा ढिगारा त्यांच्या परिसरात पडला आहे’, असे विधान केले. त्यावर पत्रकाराने ‘क्षमा करा; पण आम्ही तुम्हाला सामाजिक माध्यमांवरील मजकुराविषयी बोलण्यास सांगितले नाही’, अशा शब्दांत आसिफ यांना फटकारले.
चिनी उपकरणांचा वापर केला का?
‘भारताचे विमान पाडण्यासाठी चिनी उपकरणांचा वापर केला का ?’, असा प्रश्न आसिफ यांना विचारला असता ते म्हणाले की, नाही. चिनी उपकरण नाही. आमच्याकडे ‘जेएफ्-१७’ आणि ‘जेएफ्-१०’, ही चिनी विमाने आहेत; पण ती आता पाकिस्तानमध्ये निर्माण केली जात आहेत. जर भारत फ्रान्सकडून विमाने खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो, तर आम्ही चीन, रशिया, अमेरिका किंवा ब्रिटनकडून विमाने खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो.
सनातन प्रभात ८/५/२५