कोल्हापूर- तिच्या जन्मापूर्वीच तिच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले होते. आईच्या कष्टाच्या सावलीत ती मोठी झाली. धुणी-भांडी करत उदरनिर्वाह करणाऱ्या आईला अचानक अपघात झाला. आता सगळी जबाबदारी तिच्या अंगावर पडली. मात्र ,ती डगमगली नाही.
मेन राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेचे शिक्षण घेताना तिने पेट्रोल पंपावर कामाला सुरुवात केली. सकाळी कॉलेज आणि ११ ते ६ पंपावर काम असा तिचा दिनक्रम होता. बारावी परीक्षेत ७५ टक्के मिळवून तिने कॉलेजमध्ये पहिलं येण्याचा मान मिळवला.
लोकमत ६.५.२५