आंध्रप्रदेशातील पल्यावानापल्ली गावातील तुलसम्मा या शेतकरी महिलेने पाण्याची कमी पूर्ण करण्याकरिता इतर शेतकऱ्यांबरोबर २०१२ साली 'वॉटरयुजर ग्रुप' तयार केला.
यात सर्व शेतकऱ्यांनी मिळून एकूण ३८ एकर शेतीवर पाईपलाईन तयार केली आहे ज्याद्वारे बोअरवेलचे पाणी सर्वाना दिले जाते. याचा फायदा तेथील १६ शेतकऱ्यांना होतो आहे. यातील ४ शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल होती. बाकीच्या शेतकऱ्यांनी बोअरवेल न खणल्यामुळे भूजलपातळी चांगली राहण्यास मदत झाली आणि त्याचा फायदा सर्वांनाच झालेला दिसून आला. अशातऱ्हेने सर्वांमध्ये पाणी वाटून घेण्याच्या त्यांच्या निर्णयाने सर्वांचाच फायदा होऊन आज सर्वच शेतकऱ्यांच्या पिकात वाढ झाली आहे. आज आंध्रप्रदेशातील एकूण ७३ गावांनी याप्रमाणे पाणीवाटपाचा फॉर्म्युला अमलात आणला आहे. दैनिक भास्कर १७.३.२५.