भारताचा प्रस्ताव चीनने फेटाळला

30 May 2025 14:30:00

 
sanskrutik vartapatra china.jpg
 
पाकिस्तानी आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी चीन पुन्हा एकदा समोर आला असून त्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्या ५ आतंकवाद्यांना ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करणारा प्रस्ताव फेटाळला. भारताने हा प्रस्ताव सादर केला होता. भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांद्वारे हे आतंकवादी भारतात घडवण्यात आलेल्या अनेक मोठ्या आतंकवादी आक्रमणांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले होते.

१. अब्दुल रऊफ अशगर, साजिद मीर, अब्दुल रहमान मक्की, तल्हा सईद आणि शाहीद महमूद रहमतुल्ला अशी त्यांची नावे आहेत. हे आतंकवादी २६ नोव्हेंबर २००८ चे मुंबईवरील आक्रमण, वर्ष २०१६ मध्ये वायूदलाच्या पठाणकोटमधील तळावरील आक्रमण, वर्ष २०१९ चे पुलवामा येथील आक्रमण, वर्ष २००१ चे संसदेवरील आक्रमण आणि वर्ष १९९९ मधील विमान अपहरण यांत सहभागी होते.

 

२. भारताने ‘द रेझिस्टंट फ्रंट’ या लष्कर-ए-तोयबाच्या उपशाखेवरही संयुक्त राष्ट्रांमध्ये बंदी घालण्यासाठी ३ वेळा प्रस्ताव सादर केला होता; मात्र चीनने सर्वच प्रस्तावांना अडथळा आणला. पहलगाम येथील आक्रमणामागे हीच संघटना आहे.

चीनच्या वर्तनामुळे पाकिस्तानस्थित आतंकवादी गटांना अप्रत्यक्ष पाठबळ मिळते ! – भारत

भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अशा प्रकारे आतंकवाद्यांना पाठीशी घालणे हा आतंकवादविरोधी लढ्याला बाधा आणणारा प्रकार आहे. चीनच्या अशा वर्तनामुळे पाकिस्तानस्थित आतंकवादी गटांना अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे.

सनातन प्रभात २८/५/२५

Powered By Sangraha 9.0