राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह (सरचिटणीस) दत्तात्रेय होसबाळे यांचे विधान

03 May 2025 12:34:42

sanskrutik vartapatra rss_rss-hindu-jagruti-hosabale-speech-2025.jpg
 
हिंदू समाजात एक समस्या आहे की, कुणीतरी महापुरुष हिंदूंना जागे करतो; पण तो पुन्हा झोपी जातो. हे एकदा नाही, तर अनेक वेळा घडले आहे. हिंदू समाजाला पुनःपुन्हा जागे करावे लागते. डॉ. हेडगेवार यांनीही तेच केले आहे. संघाने नेहमीच हिंदूंना जागे केले आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह (सरचिटणीस) दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले. ते संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.

दत्तात्रेय होसबाळे यांनी केलेले मार्गदर्शन

१. गेल्या १०० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाला जागृत करत आहे. म्हणूनच गेल्या १०० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सतत वाढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताला नव्याने हिंदू राष्ट्र बनवत नाही, तर ते आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे.

२. रा.स्व. संघ जातींमध्ये विभागलेल्या हिंदूंना राष्ट्रीय हिंदू बनवत आहे. संघ हिंदूंना शक्तीशाली बनवत आहे.

३. भारत आता पुन्हा उदयास येत आहे आणि तो केवळ जगाच्या कल्याणासाठी उदयास येत आहे. भारताची प्रगती कुणालाही गुलाम बनवून होणार नाही.

सनातन प्रभात २२/४/२५
Powered By Sangraha 9.0