पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकच्या १७ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. यात जियो न्यूज, डॉन न्यूज, समा टीव्ही या प्रसिद्ध वाहिन्यांसह प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू कासमी, तसेच माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या वाहिनीचा समावेश आहे. या वाहिन्यांवरून भारत आणि सुरक्षा यंत्रणा यांच्या विरोधात खोट्या अन् दिशाभूल करणार्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.
सनातन प्रभात २८/४/२५