स्त्रीचं आयुष्य म्हणजे 'चूल आणि मूल' एवढंच मानलं जायचं. पण 'उमेद' या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या व्यासपीठावरून जाग्या झालेल्या स्त्रीशक्तीने नवा अध्याय रचला आहे.
गतकाळात राज्यातील तब्बल ४०७ महिलांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करीत उद्योग जगतात 'मालकीण' म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. कधीकाळी दुर्लक्षित असलेली 'ती' सध्या यशस्वी उद्योजिका म्हणून कोट्यवधीच्या उलाढालीमध्ये गुंतलेली आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दारिद्रय निर्मूलनासाठी उमेद अभियान सुरू इअर बिगर शेती उद्योगांच्या माध्यमातून ४०७ महिलांनी कंपन्या थाटल्या आहेत.
या स्त्रीशक्तीला केवळ रोजगारच नव्हे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तर स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
यवतमाळ आघाडीवर
राज्यात यवतमाळच्या स्त्रीशक्तीने सर्वाधिक उद्योग थाटले आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापूर, वर्धा, सोलापूरच्या उद्योजक महिला आहेत सांगली (६), छत्रपती संभाजीनगर व अकोला (प्रत्येकी ७) तळाशी आहेत.
लोकमत २४.५.२५