देशात इस्लामिक शासन आणण्याचा पीएफआयचा चारकलमी कार्यक्रम

Vartapatra    30-Jun-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra islamic_34
 
देशातील मुस्लिमांना एकाच झेंड्याखाली आणणे, राजकीय पक्षाद्वारे समाजात फूट पाडणे आणि एसडीपीआयला देशातील मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व करणारा एकमेव पक्ष बनवणे असा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) कट असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) दोषारोपपत्रात स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) स्वयंसेवक श्रीनिवासन यांच्या हत्येचा तपास एनआयए करत आहे. याप्रकरणी पीएफआयवर बंदीदेखील घालण्यात आली आहे. एर्नाकुलम न्यायालयात एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेचे सदस्य आणि अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून एका मोठ्या कटात सहभागी होते. त्यांचा उद्देश २०४७ पर्यंत देशात दहशत पसरवणे, सांप्रदायिक तणाव वाढवणे आणि भारतात इस्लामिक राजवट लादणे हा आहे.

एनआयएच्या मते, पीएफआयचे सदस्य यापूर्वी सिमीसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. त्यांचे लष्कर-ए-तोयबा, आयसिस आणि अल-कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संबंध आहेत. संघटनेचे अनेक कार्यकर्ते या दहशतवादी संघटनांचे सदस्य राहिले आहेत. केरळसह देशाच्या अनेक भागात पीएफआयच्या लोकांनी हिंसाचार आणि खून केले, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एनआयएचा दावा आहे की पीएफआय केवळ दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत नव्हता, देशात अनेक ठिकाणी शस्त्रसाठा करण्याचीही योजना होती.

मुंबई तरुण भारत २८/६/२५