शांघाय परिषद घोषणापत्रावर स्वाक्षरीस भारताचा नकार

Vartapatra    28-Jun-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra antarrashtriya_2
 
चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेनंतर भारताने संयुक्त घोषणापत्रात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा उल्लेख टाळल्याने त्यावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. दहशतवादावरील भारताच्या भूमिकेत तडजोड केल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला.

राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शिखर परिषदेतील आपल्या भाषणात यावर जोर दिला की, एससीओ सदस्यांनी या दुष्ट प्रवृत्तीचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे. त्यांनी सीमापार दहशतवादासह दहशतवादाच्या घृणास्पद कृत्यांचे सूत्रधार, आयोजक, वित्तपुरवठा करणारे आणि प्रायोजक यांना जबाबदार धरून त्त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे आणि भारताचा सर्व प्रकारच्या आणि स्वरूपातील दहशतवादाशी लढण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. त्यांनी दहशतवादाच्या प्रत्येक कृत्याला, त्याचा हेतू कोणताही असो, ते कुठेही, केव्हाही आणि कोणीही केले असले तरी, गुन्हेगारी आणि अन्यायकारक ठरवले.


राजनाथ सिंह का संतापले ?

संरक्षण मंत्र्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. दहशतवादापासून स्वतःचा बचाव करण्याचा आणि भविष्यातील सीमापार हल्ले रोखण्याचा अधिकार भारताने वापरला आहे. त्यामुळे त्याच घटनेचा घोषणापत्रात उल्लेख नसेल तर ते अर्थहीन ठरेल, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

पुढारी २७/६/२५