माहीत असावं असं काही

Vartapatra    26-Jun-2025
Total Views |
 

Sanskrutik Vartapatra_Anya_69
 
जून महिना उजाडला की सर्वांनाच पावसाचे वेध लागतात. शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात करतो. अशा या पावसाचा थेंब जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्याला माहीत आहे का?

पावसाचे थेंब सरासरी १४ किमी प्रतितास या वेगाने जमिनीकडे येतात. पावसाचे मोठे थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी सुमारे दोन मिनिटे लागतात. तर लहान थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी सात मिनिटे लागतात.
मोठे थेंब ताशी २० किमी वेगाने पृथ्वीवर पोहोचतात त्यामुळे अगदी दहा मिनिटे पाऊस पडला तरी पाणी साचते. तसेच पावसाचे थेंब गोलाकार असतात याचे कारण पाण्याचे रेणू पृष्ठभागावरील ताणामुळे एकत्र धरले जातात; पण पडल्यानंतर इतर पावसाच्या थेंबाशी आदळल्याने त्यांचा आकार बदलतो.हवेच्या प्रतिकारामुळे थेंबांचा तळ सपाट होतो आणि जेली बिनच्या आकारासारखा वक्र होतो.
भारतातील मेघालयमधील मावसिनराम येथे सरासरी पाऊस ११,८७१ मि.मि होतो जो जगातील सर्वाधिक आहे.

पुढारी .