
सिंधु जल करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर परिस्थितीत मूलभूत पालट झाले आहेत. हे निर्विवाद सत्य आहे. यासाठी कराराच्या दायित्वांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. या पालटामध्ये तांत्रिक प्रगती, हवामान पालट आणि सीमापार आतंकवादाचा सततचा धोका यांचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानच्या सीमेपलीकडून होणारा आतंकवाद हा या कराराच्या तरतुदींनुसार त्याचा गैरफायदा घेण्याच्या क्षमतेत अडथळा आणतो. स्वतः कराराचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानने कराराच्या उल्लंघनाचा दोष भारतावर टाकणे थांबवावे, अशा शब्दांत भारताचे पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पाकिस्तानला फटकारले. येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हिमनद्यांवरील परिषदेच्या एका सत्राला संबोधित करतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘भारताने सिंधु जल करार स्थगित केल्याचा निर्णय हा एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय आहे’, असे म्हटले होते. तसेच राजकीय लाभासाठी लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवता कामा नये. पाकिस्तान हे होऊ देणार नाही. आम्ही कधीही लाल रेषा ओलांडू देणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
सनातन प्रभात १/६/२५