निसर्गातील प्रत्येक जीव आपल्या वेगळेपणामुळे ओळखला जातो. त्यातला असाच एक प्राणी जो तब्बल तीन वर्षं न खातापिता राहू शकतो. तो म्हणजे 'गोगलगाय'.
गोगलगाय तीन वर्ष न खातापिता राहण्याचे कारण ती तीन वर्षं झोपते. इतकी वर्षं झोपण्यामागचे कारण म्हणजे जेव्हा हवामान खूप उष्ण आणि कोरडे असते तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गोगलगाय झोपेचा आधार घेते. ती स्वतःला तिच्या कवचात म्हणजेच शंखात लपून गाढ झोपेत जाते. आणि जेव्हा दमट, ओलसर ऋतू येतो तेव्हा ती कवचातून बाहेर पडते.
पुढारी १९.६.२५