बांगलादेशातील गोपालगंज जिल्ह्यातील कोटलीपारा भागात १३ जून या दिवशी मुसलमानांनी हिंदूंची ६ मंदिरे लुटली.
‘एनटीव्ही न्यूज’च्या वृत्तानुसार एका हिंदू महिलेचे म्हणणे आहे की, १२ जून या दिवशी दुयरेपारा येथे मंदिर लुटले गेले. आज ५ मंदिरे लुटली गेली. पूजेसाठी ठेवलेल्या सर्व वस्तू लुटल्या गेल्या. असे नेहमी घडले, तर आम्ही प्रत्येक वेळी चोरी झालेली पूजा सामग्री परत मिळवू शकणार नाही. पितळ आणि कांस्य धातूंची भांडी खरेदी करण्यासाठी फार पैसे लागतात. आमच्याकडे प्रत्येक वेळी हे साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. आमच्या मौल्यवान वस्तूंची लूट रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.
मी सरकारला मनापासून विनंती करत आहे. हिंदू समुदाय त्यांच्यावरील अत्याचार सहन करण्यास सक्षम नाही. आम्ही आता कसे जगू ? आम्ही सरकारचे लक्ष वेधून घेत आहोत. गुन्हेगारांना पकडण्याचे सरकारचे काम आहे. आम्ही असाहाय्य आहोत आणि आम्ही काहीही करू शकत नाही.
सनातन प्रभात १६/६/२५