परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची पाकला चेतावणी!

Vartapatra    13-Jun-2025
Total Views |


sanskrutik vartapatra antargat suraksha_22 

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बेल्जियममध्ये पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे – "आतंकवाद सहन करणार नाही, गरज पडल्यास पाकिस्तानच्या कोणत्याही भागात कारवाई करू." 'ऑपरेशन सिंदूर'चा संदर्भ देत त्यांनी भारताच्या लष्करी ताकदीची आठवण करून दिली.
१. जयशंकर पुढे म्हणाले की, पाकिस्तान हा एक असा देश आहे, जो आतंकवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून करतो. हाच त्यांचा उद्देश आहे.
. 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी भारताची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांनी पाकिस्तानची मोठी हानी केली. त्यामुळे पाकिस्तान गुडघे टेकत शस्त्रसंधीसाठी सिद्ध झाला. राफेल असो कि इतर क्षेपणास्त्रे ही किती प्रभावी आहेत, याचा पुरावा पाकिस्तानची नष्ट झालेली वायूदल तळी आहेत, असे जयशंकर यांनी सांगितले.
नवभारत ११/६/२५