येवला (नाशिक) येथे बकरी ईदच्या दिवशी गोवंशियांना नेणारा ट्रक गोरक्षकांनी पकडला !
कत्तलीच्या उद्देशाने गोवंशियांना नेणारा मालवाहू ट्रक गोरक्षकाच्या साहाय्याने पोलिसांनी पकडला आहे. यातील २० गोवंशियांची सुटका करण्यात आली आहे. ७ जून म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.संगमनेर येथून मालेगावच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने मालवाहू ट्रकमध्ये गुरे असल्याची माहिती बजरंग दल, प्राणी फाउंडेशन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर ट्रक शहरातील मुक्तानंद विद्यालयासमोर अडवण्यात आला. या वेळी ट्रकची अचानक पडताळणी केली असता त्यात २० गोवंश आढळले. नंतर हे गोवंश कह्यात घेण्यात आले. ट्रकचालक पसार झाला आहे. गोरक्षकांनी गोवंशियांची रवानगी पांजरापोळमध्ये केली आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून ट्रकचालकावर गुन्हा नोंद केला आहे.हिंदुबहुल बदरपूर (आसाम) येथे शिवमंदिराजवळ बकरी ईदच्या वेळी गोहत्याश्री भूमी जिल्ह्यातील बदरपूर येथे बकरी ईदच्या वेळी गोहत्या करण्यात आली. ही घटना डेव्हरेल आणि दक्षिण भंगा मखाली गावाजवळील शिवमंदिराजवळ घडली, ज्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये संताप आहे. या भागात केवळ ३ मुसलमान कुटुंबे रहातात. हिंदूंनी मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी जिहाब उददिन, जियस उददिन, नाझरुल इस्लाम, फखरुल इस्लाम आणि हुसेन अहमद बार्बुया यांना अटक केली.उदयपूर (त्रिपुरा) येथे बकरी ईदला गोहत्या करणार्या ४ मुसलमानांना अटकगोमती (त्रिपुरा) – येथील उदयपूर उपविभागाच्या चॅनबॅन क्षेत्रात बकरी ईदच्या निमित्ताने गोहत्या झाल्याची घटना घडली. गायीचे अवशेष येथील भूमीत गाडण्यात आले.या प्रकरणी पोलिसांनी ४ मुसलमानांना अटक केली आहे. येथे तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सनातन प्रभात ९/६/२५