आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमा का साजरी केली जाते यामागची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण यामागचे वैज्ञानिक कारण किंवा दृष्टीकोन माहीत असणेही तेवढंच गरजेचं आहे. वडाचे झाड हे इतर झाडांच्या तुलनेत अधिक प्राणवायू (ऑक्सिजन) सोडते आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते.
त्यामुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते. हे झाड पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे समजण्यासाठी आज वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया याची पूजा करतात. वडाचे झाड सुदृढ आणि दीर्घायुषी असल्यामुळे त्यासारखे आयुष्य मिळावे हेही त्याची पूजा करण्यामागचे कारण आहे.
घरात त्याची फांदी तोडून त्याची पूजा करणे हे तितकेच चुकीचे आहे, यामुळे काहीही साध्य होत नाही.
इंटरनेटवरून