हरियाणातील नुह जिल्ह्यात, पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या २३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. बाजारका गावात हे लोक स्थानिक वीटभट्टीवर काम करताना आढळले.या भट्टीत बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या परदेशी नागरिकांची उपस्थिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला आणि सर्व २३ जणांना ताब्यात घेतले.अटक केलेल्यांपैकी कोणत्याही व्यक्तीकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे नव्हती याची पुष्टी पोलिस प्रवक्ते कृष्ण कुमार यांनी केली. या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे नागरिक भारतात कधी, कसे आणि कोणत्या मार्गाने आले, त्यांचे स्थानिक संबंध आणि योग्य पडताळणीशिवाय त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांची भूमिका तपासण्याचा प्रयत्न पोलिस आता करत आहेत.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा बेकायदेशीर रहिवाशांवर नियमित कारवाई केली जाईल यावरही कृष्ण कुमार यांनी भर दिलाअटकेनंतर, पोलिसांनी स्थानिक वीटभट्टी मालकांना आणि इतर व्यावसायिकांना त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची योग्य पोलिस पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे आणि असे न केल्यास मालकांवरही कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा दिला आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की अशी पावले केवळ बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठीच नव्हे तर परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी देखील महत्त्वाची आहेत.नुह पोलिसांनी रहिवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, तसेच कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा योग्य कागदपत्रांशिवाय परिसरात राहणाऱ्या व्यक्तींची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी असेही म्हटले आहे की भविष्यात अशा कठोर कायदेशीर कारवाई आणखी तीव्र केल्या जातील जेणेकरून बेकायदेशीर कारवाया पूर्णपणे रोखता येतील.
ईटीव्ही भारत १७/५/२५