समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या सरकारी मदतीच्या आणि सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने शिर्डीजवळ चितळी (ता.राहता) येथे राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे, अशी माहिती तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी दिली.
म.टा १७.५.२५.