
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत, तसेच पहार्यात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही आणि ड्रोन यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांत पहारा वाढवला आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन यांच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम चालू केली असून त्या अंतर्गत सागरी पहारा वाढवण्यात आला आहे. मासेमारांना सतर्क रहाण्यास आणि नौकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मासेमार नौकांच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर पडताळणी वाढवण्यात आली आहे.
सनातन प्रभात ०९/५/२५