सजग रहो
भारत पाकिस्तानदरम्यान मोठी लढाई सुरू झाली आहे. पहिले दोन दिवस ऑपरेशन सिंदूर चालले आणि त्यानंतर ९ मे रोजी पुन्हा संध्याकाळी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू झाले, भारतीय सैन्य त्याला नामशेष करत आहे असं चित्र आहे तरी ...
अशा परिस्थितीत भारतातील देशविरोधी संघटना काय करतात याचा अंदाज सगळ्यांना असायलाच हवा.
APLMB म्हणजेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने युद्धाऐवजी संवाद व चर्चा व्हावी असे म्हटले आहे. आपल्याकडील सर्व लिबरल,पुरोगामी आणि डाव्या संघटना युद्ध थांबवण्यासाठी भारतीय सैन्यावर दबाव आणत आहेत. युद्ध थांबवण्याचा त्यांचा त्यामागचा हेतू एक म्हणजे भारतातील दहशतवादाची समस्या कायमची संपेल. दुसरे पाकिस्तानचे तुकडे होतील, तिसरे भाजप आणि एनडीएला स्वाभाविक राजकीय फायदा होईल. चौथे भारतातील देशविरोधी जिहादी शक्तीला तारणहार उरणार नाही. या सर्व कारणांमुळे डाव्या पुरोगामी जमातीला पोटदुखी होत आहे. शिवाय डाव्या पुरोगामी शक्ती आणि इस्लामिक शक्ती यांची छुपी युती आहेच.
हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे आणि सजग राहायला हवे.
Vsk,, देवगिरी