भारतात १६ एप्रिल १८५३ या दिवशी पहिल्यांदा रेल्वे धावली होती. ही पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे या दरम्यान धावली. सुमारे ३४ किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी रेल्वेला ५७ मिनिटे लागली होती. या रेल्वेला सिंध,सुल्तान आणि साहेब या तीन इंजिनांनी खेचले होते. या गाडीत चारशे विशेष अतिथी होते. या गाडीचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले गेले. यात बँडचादेखील समावेश होता.
भविष्यात देशात आताची रेल्वे बदलून हाय स्पीड बुलेट ट्रेनपेक्षा अधिक वेगवान हायपरलूप तंत्राचा वापर असलेली रेल्वे होऊ शकेल. तसेच ही रेल्वे पूर्णतः हरीत उर्जेवर चालतील. एआय आणि ऑटोमेशनच्या मदतीने रेल्वेला वाहकांची गरज भासणार नाही.
महाराष्ट्र टाइम्स १६.४.२५.