मेवातमध्ये हिंदू महिलांची सुरक्षा धोक्यात?

वाढती लोकसंख्या आणि बदलते सामाजिक स्वरूप – मेवातमधील हिंदू भगिनींना भीतीचे वातावरण का अनुभवावे लागते?

Vartapatra    29-Mar-2025
Total Views |

sanskrutik vartapatra_mewat-hindu-women-safety-issue-in-rajasthan
भारतातील एका गावात परिस्थिती अशी बिकट झाली आहे की, हिंदू भगिनींना भीतीपोटी मुलांचे कपडे घालून फिरावे लागत आहे. इतकेच नाही, तर मुलींचे कपडेसुद्धा बाहेर वाळत घालण्याची भीती वाटते. त्यांना स्वतःच्या घरात त्यांना लपून राहायला लागत आहे. कारण या गावातील वाढलेली मुस्लिम लोकसंख्या.
 
धक्कादायक बाब अशी की, महाराणा प्रताप यांच्या राजस्थानमधील मेवात भागाची आहे. येथे मुस्लिमांची संख्या तब्बल ८०%, तर हिंदूंची संख्या केवळ २०% इतकी आहे. त्या गावात मुलींवरील अत्याचारांच्या घटना सर्वाधिक नोंदविल्या जात आहेत.
महत्त्वाची बाब अशी की, मागील काही वर्षांमध्ये मेवात भागात रोहिंग्या घुसखोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या घुसखोरीमुळे येथील लोकसंख्येचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले असून त्याचा थेट परिणाम हिंदू समाजाच्या सुरक्षिततेवर आणि सामाजिक संतुलनावर होत आहे. इथे परिस्थिती इतकी भयावह आहे की, इस्लामिक कट्टरपंथीयांच्या त्रासाला कंटाळून, तेथे मुलींचे लग्न १४ व्या वर्षीच उरकून टाकण्यात येते.

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी "मिनी पाकिस्तान" निर्माण होत आहे. याच अनुषंगाने मेवात हा खरेतर हिंदू महिलांसाठी एक धडा ठरला आहे. जर उद्या मुस्लिमांची संख्या वाढली, तर, त्याचा सर्वाधिक त्रास 'हिंदू भगिनींना' सहन करावा लागणार आहे. इस्लाममध्ये महिलांचे स्थान या विषयावर कायम टिकात्मक चर्चा होते. परंतु, काफिर समजलेल्या धर्मातील महिलांची काय दुर्दशा होते, याचे चालते बोलते उदाहरण मेवात गावात दिसून येते.

भौगोलिक दृष्ट्या मेवात हा भाग राजस्थान, हरियाणा,उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये विभागला गेला आहे, सुरवातीला हा भाग मुस्लिम बहुल नव्हता. परंतु १९९२ नंतर त्यातही मुस्लिमांनी हिंदूंवर आणि त्यांच्या दुकानांवर, बहिष्कार टाकण्यास सुरवात केली. याच मुळे तेथील बरेच हिंदू स्थलांतरित झाले. आणि गेल्या काही वर्षात तेथे रोहिंग्या, तबलिगी जमात यांचे प्रमाण तेथे वाढत चालले आहे.

२०२० मध्ये सेवानिवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पवन कुमार यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने मेवातमधील परिस्थितीवर एक रिपोर्ट तयार केला होता. त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी मांडले होते की, मेवात कश्या प्रकारे हिंदूंसाठी एक नरक बनले आहे. त्या रिपोर्ट नुसार ५०० पैकी १०३ गाव अशी आहेत की, जी हिंदूविरहित झाली आहेत.

वायुवेग २५