औरंगजेबासारखा आक्रमक भारताचा आदर्श होऊ शकत नाही- रा.स्व.संघ

Vartapatra    25-Mar-2025
Total Views |


RSS25.03.2025

 
औरंगजेबासारखा परकीय आक्रमक स्वतंत्र भारताचा आदर्श होऊ शकत नाही. जे भारताच्या मातीत जन्माला आले ते आपले आदर्श; जे आक्रमक आहेत ते आपले आदर्श असू शकत नाहीत. इंग्रजांच्या विरुद्ध जो झाला तो स्वातंत्र्यसंग्राम होता असे आपण म्हणतो. पण त्याआधी जे परकीय आक्रमक आले त्यांच्याविरुद्ध जे जे लढले तेसुद्धा स्वातंत्र्यासाठी लढले. राणा प्रताप यांचे युद्ध हे स्वातंत्र्ययुद्धच होते. त्यामुळे स्वतंत्र भारतातल्या व्यक्तींनी ठरवायचे आहे की आपला आदर्श कोण आहे. इतिहासाशी नाते कसे जोडायचे हे आपण विचार करून ठरवायचे आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री.दत्तात्रेय होसबळे यांनी काढले. बेंगळूरू इथे झालेल्या अखिल भारतीय प्रतीनिधी सभेत ते बोलत होते.
 

ऋतम् मराठी २३.३.२५